दोन महिन्यापूर्वी मी भारतात- पुण्यात असताना घडलेला हा प्रसंग..
तांदुळ आण असे घरुन सांगितले म्हणून गेलो होतो दुकानात, त्याला म्ह्टलं कि ३-४ नमुने दे पाव पाव किलोचे, करुन बघतो, जो चांगला वाटेल तो २ दिवसांनी घेऊन जाईन पोतंभर.
दुकानदार म्हणाला " नही साह्ब, कमसे कम १ किलो लेना ही पडेगा"
मी (मराठीतच) " पाव किलो देतोस का , तरच घेतो'
"नही साहब. १किलो"
मी " नाही घेत जा"
"ठीक है साहब"
डोकं सणकंल होतं. अजून काही औषधे घ्यायची होती.
समोर " ग्रेवाल मेडिकल" मध्ये गेलो.
तो पण गुर्मीत म्हणाला " वैट करना होगा" मी काही बोलायच्या आधीच, त्याची मस्ती सुरु झाली होती.
मी म्हणालो ( मराठीतच) " अरे हो बाबा , मला दिसतंय तू बिझी आहेस ते, मी थांबतो थोडावेळ"
तर मस्तवाल ग्रेवाल म्हणतो कसा " हिन्दी मे बात करिये, मराठी नही समझती"
तांदुळाच्या एपिसोडावरुन टाळकं फीरल होतं त्याला म्हणालो " हरामखोर, भोसडयात गेलास. जरा पुढे गेलो की चव्हाणांचं दुकान आहे, तिथे घेतो"
मी तर निघालो तिथून, पण माझ्या रुद्रावताराचा परिणाम म्हणून कि काय माझ्या आधी आलेल्या ५ कस्टमरांनी त्या ग्रेवालकडून आप्-आपली प्रिस्र्क्रिप्शन काढून घेतली आणि ते ही माझ्या बरोबर चव्हाणांच्या दुकानात आले.
सध्या मराठी अस्मितेचा मुद्दा जोरात आहे, राज ठाकरे त्यांचे विचार आणि इतर घडामोडीनी महाराष्ट्र ढवळून निघालाय. तिकडे असताना काही वाटत नाही ह्या सगळ्या गोष्टींचं पण इकडे इतक्या दूर मात्र बरंच काही जाणवत रहातं.
अश्या मनस्थितीत बरेच विचार येऊन गेले मनात.
तिकडे तामिळी लोक बघा. श्रीलंकेत हे तामिळी दहशतवादी कारवाया करतात. आपले एक पंतप्रधान - त्यांची हत्या केली. आता त्या अतिरेक्यांच्या मुसक्या आवळत आणल्या श्रीलंकेच्या लष्कराने, तर हे सगळे तामिळी एकासुरात गळा काढू लागले. मलेशियात ह्यान्च्या वंशीयावर थोडी कारवाई केली तरी ह्याना इथे भारतात कळा येतात.
आणी आपण मराठी माणसे, आपल्या अस्मितेबद्दल एव्ह्ढे उदासीन का? असेल राजचे एक्झेक्युशन चुकीचे, पण विचार तरी धगधगतायत ना? उद्या हे बिहारी आपल्याकडे येऊन आपली डेमोग्राफी बदलून टाकतील.
अमरनाथ ट्र्स्ट्ला जमीन दिली तर तो ओमार अब्दुल्ला काश्मीरियतचे गळे काढू लागला, त्यात त्याला काश्मीरची डेमोग्राफी बदलण्याचे डावपेच दिसू लागले.
आसामी लोकांनी, आसामात परीक्षेला आलेल्या, बिहारी आणी बंगाली उमेदवारांना हाकलून दिले, तेव्हा सगळे कसे गप्प बसले होते?
मग आता राजने काही केलं ,( त्यामागचा त्याचा उद्देश काही असो) तर आपण मराठीच का ओरड करतो?
इथे महाराष्ट्रात हे भय्ये येऊन त्यांचे काय काय धंदे चालतात ते पहा.
तिकडे आमच्या कोकणात, मल्याळी येऊन शेती करतात- अननसाची आणि माशांची. अननसाची शेती कसली हो? अननसाच्या कोवळ्या कोंबाच्या गंधाने तिकडे नाग आकर्षित होतात, त्यांना पकडून , विषाची आणि कातड्याची तस्करी करतात हे.
ह्या सगळ्यांना महाराष्ट्रच का हवा? तुमचे राज्य विकसीत करा ना?
परप्रान्तीय आय्.ए.एस्.अधिकारी मुंबईत मंत्रालयात बसून , आपल्याकडे मंजुरीला आलेले उद्योग बंगाल आणि कर्नाटकात कसे जाईल ते पाह्तो. हे सगळं बंद व्ह्यायला हवं.
बॅळगाव, निपाणी, गुलबर्गाच्या सरकारी एस्.टी डेपोत जाऊन बघितलेय कधी? बघा महाराष्ट्राच्या एस्.टी गाड्या आणि त्यांच्या चालक- वाहकाला मिळणारी वागणूक. महाराष्ट्राच्याबॉर्डरपर्यन्त गाडी रिकामी येते. कर्नाटकाच्या डेपोच्या फलाटाला लावू दिली जात नाही. विरोधाभास म्हणजे नाशीकपासून कोकणात राजापुरपर्यन्त आणि शिर्डीपासून लातुरपर्यन्त त्यान्च्या कानडी बोर्ड लावलेल्या एस्ट्या मात्र बिन्दिक्कत् फिरत असतात.
अमेरिकेत आणि इंग्लडात इतके परकिय नागरिक आहेत, सरकारी नोकर्या करताहेत, पण म्हणून विमानतळावर इमिग्रेशन ऑफिसर "बाहेरचे" नसतात. ते मात्र नेटीव्ह्च असतात कि नाही?
मग आपण सगळ्याचे महाराष्ट्रात स्वागत का करतो? त्याना मोक्याच्या नोकर्या का देतो?
परवाच्या पुणे सकाळ मधील फॅमिली डॉक्टर ह्या पुरवणीसाठी एक पाककृती स्पर्धा झाली होती त्यात १, २ आणी ३ हे क्रमांक कुणाला मिळाले असतील बरं? सौ. गुप्ता,सौ ओस्वाल आणि सौ.गुजराथी. सकाळने तिन्ही भगिनींच्या पाककृती जश्याच्या तश्या छापल्या आहेत. त्यातील मराठी वाचवत नाही. पुणे सकाळच्या स्पर्धेचा हा निकाल आपल्याला काय सांगतो?
महाराष्ट्राची डेमोग्राफी बदलतेय ती ह्या लोंढ्यामुळेच!!
बघा हे असेच चालू राहिले तर मुंबई- पुण्यात महापालिकेचे व्यवहार हिंदीत होऊ लागतील, आपल्या मुलाना शिकवायला एखादा बिहारी असेल, रेलेवेच्या घोषणा भोजपूरीत होऊ लागतील, सरसोच्या तेलातील बटाटेवडे स्टेशन च्या बाहेर गाडीवर मिळतील, नाष्ट्याला फाफडा अने कढी किंवा जलेबी - दही मिळू लागेल. स्टैट बैंकेत जाऊन आपल्याला धनाचे आवंटन करावे लागेल, घरी गैसचा सिलिंडर घेऊन भैय्या येइल, वैभव आणी विजयचे बैभब आणि बिजय होतील, तसे झाले तरी कुमार केतकरप्रभॄती वसुधैव कुटुंबकम चे नारे देतील!!
मराठी संस्कृती वरचे हे आक्रमण आपणच थांबवू शकतो.
बघा पटतंय का? म्हणून सांगतो..असेल राजचे एक्झेक्युशन चुकीचे, पण विचार तरी धगधगतायत ना? मग आता राजने काही केलं,( त्यामागचा त्याचा उद्देश काही असो) तर आपण मराठीच का ओरड करतो?
Subscribe to:
Post Comments (Atom)
very gud
ReplyDeletekeep it up
Khoopacha chan lihita rokh thok--
धन्यवाद.
ReplyDeletethats rhe spirit!
ReplyDeletewe should answer them in same fashion
it require unity of mararhi people