Showing posts with label रोखठोक. Show all posts
Showing posts with label रोखठोक. Show all posts

December 2, 2008

मुंबईवरील हल्ले, चॅनेलवाले आणि काही जाहिराती

ह्या सगळ्या हल्ल्यांमध्ये मला दोन घटना खटकल्या.

पहिली म्हणजे चॅनेलवाल्यांचा अति- उत्साह..

चॅनेलवाले पण अति उत्साही, कमांडो हेलिकॉप्टर्मधून खाली कसे उतरले? ताज मध्ये शिरताना करकरेंनी अंगावर काय काय घातलंय? ताजमध्ये अडकलेल्या पत्रकार कोणत्या रुम मध्ये आहेत? अजून किमान १०० लोक आत अडकले आहेत. घ्या अतिरेक्यांनो तुम्हाला १०० बकरे आहेत अजून कत्तल करायला. मिडिया अशी माहिती विनासायास अतिरेक्यांच्या कमांडसेंटरला पोचवत होता.

सगळ्यवर कडी केली ती चरखा बाई मठ्ठ ह्यांनी, सुटका झालेल्या परदेशी महिलेला चरखा बाइ विचारत्या झाल्या “ इतके होवूनही तुम्ही भारतात परत याल का?” ह्या प्रश्नातून काय सूचित करायचं होतं चरखाला कोण जाणे? त्या महिलेनेच सांगितलं की असं कुठेही होवू शकतं त्यामुळे परत न येण्याचा विचार कशाला करु. तेव्हा चरखा मुस्काडात बसल्यागत गप्प.

श्रीयुत लाजबीज छोडदेसाइ तर दमच घेत नव्हते. आमच्याच चॅनेलने किती बातम्या ब्रेक केल्या ह्याची आकडेवारी देताना त्यांची धावपळ उडत होती.

मिडीयाला किती आणि काय दाखवायची परवानगी दयावी ह्याचे काही नियम आहेत की नाही? अश्याप्रसंगी काय करायचे ह्याची काही आखणी आहे की नाही. नसेल तर आता तरी ती सरकार करणार की नाही? ह्या मिडियावाल्यांनाही काही पाचपोच आहे की नाही? भारतीय प्रसारमाध्यमांना आता एवढी वैचारिक समज कधी येइल?

आणि आता दुसरी अजूनच व्यथित करणारी घटना जाहिरातींबद्द्लची..
ह्या गंभीर घटनेचं भांडवल करायला राजकारणीच नव्हेत तर अनेक भारतीय कंपन्या देखील पुढे सरसावल्यात. सध्या सुरु असलेली एअरटेल ची जाहिरात पाहिलीत? आर्यभट्ट,चाणक्य, सुश्रुत, जगदीशचंद्र बोस, विनोद धाम ते अगदी गांधीजी( An Indian who won war without fight) अश्या इतिहासात आणि वर्तमानात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या महान भारतीयांचे, An Indian who invented the chip, An ancient Indian economist ,असे त्यांच्या Indian असण्याचे दाखले देउन झाले की ही जाहिरात Indian मधील I आणी Bharati मधील I ह्यात साम्य दाखवते. किंबहुना ह्या दोन्ही शब्दांमधला I एकसारखाच चित्रीत केला आहे. ह्या दोन्ही शब्दांची कॅलीग्राफी(अक्षरलेखनाची पद्धत) आणी रंगसंगती ही एकसारखीच. परिणाम साधण्यासाठी संपूर्ण जाहिरात कॄष्ण-धवल रंगात. देशभक्तीपर संगीत पार्श्वभूमीवर सुरुच असते. आणी मग Proud To Be Indian अशी पंचलाइन एकू येते. अशीच एक दुसरी जाहिरात म्हणजे ज्या समूहाच्या हॉटेलावर हल्ला झाला त्या टाटा समूहाच्या टाटा इंडिकॉम ह्या दूरध्वनी सेवेची. त्यांनी ही असेच देशभक्तीपर संगीताच्या पार्श्वभूमीवर आपल्या “इंडि”कॉम ची जाहिरात केलेली आहे. ही अगदीच कमी कालावधीची जाहिरात फक्त पंचलाइन सांगून जाते. राजकारण्यांनतर हे व्यावसायिक सुद्धा आता मॄतांच्या टाळूवरचे लोणी खायला निघाले आहेत.

दहशतवादी हल्ल्यांनंतर जो एक युफोरिया निर्माण झाला आहे त्याचे भांडवल करु पाहणारी ही किळसवाणी आणि विकॄत मनोवॄत्ती.

पण ह्या युफोरियाचे विधायक शक्तीत रुपांतर करण्याची आज गरज आहे. त्यातूनच भारताला ह्या समस्येवरचा उपाय सापडेल.

मंबइवरील हल्ले आणि काही प्रश्न

मुंबईवर लादल्या गेलेल्या युद्धात जे शूर पोलिस , जवान आणि कमांडो अधिकारी हुतात्मा झाले त्यांना माझी श्रद्धांजली.

गेले काही दिवस माझी घुसमट सुरु आहे. अनेक उलट- सुलट लेख, प्रतिक्रिया, ब्रेकिंग न्यूज मध्ये माझा कोंडमारा होतोय. पण मी अंतर्मुख होवून विचार केला आणि एक निर्णय घेतला आहे.

असे हल्ले भारतातच काय जगात कुठेही होउ शकतात. कुणी सांगावे? मलाही एखादवेळीस ओलिस ठेवले जाउ शकते. त्यामुळे जर असा प्रसंग माझ्यावर ओढवला तर माझ्या सुटकेसाठी कोणत्याही अतिरेक्याला सोडू नये. अशी इच्छा मी माझ्या कुटुंबीयांकडे व्यक्त केली आहे. असा प्रसंग माझ्यावर आलाच तर त्यांनी तसे सरकारला कळवावे. आपल्याला पटत असेल तर बघा. आपणही असा निर्णय घ्या असे माझा आग्रह नाही. मी जे ठरवले ते माझे वैयक्तिक मत आहे. पण देशासाठी प्राण देणारया बहाद्दर सैनिकांसाठी आपण एवढे नक्की करु शकतो. बघा मनाशी फक्त कल्पना करा अश्या प्रसंगाची. आणि त्यानंतर तुलना करा त्या बहाद्दरांच्या कुटुंबियांवर ओढवलेल्या प्रसंगाची. तेव्हा तुम्हाला ह्या प्रसंगाचे गांभीर्य समजेल.

अशी वेळ आपल्या देशावर का यावी? १९९२ मध्ये अतिरेक्यांनी सागरी मार्गाचा वापर करुन स्फोटके उतरवली. आज १६ वर्षानंतरही तोच मार्ग त्यांनी अनुसरला. आपली सुरक्षा व्यवस्था इतकी पोकळ आहे? महासत्ता होण्याच्या गप्पा करतो ना आपण?

अतिरेक्यांना “ दीज पर्सन्स” म्हणणारे, दिवसाला तीनदा कपडे बदलणारे, मंद दबक्या आवाजात बोलणारे केंद्रीय गॄहमंत्री, सिनेस्टार पुत्राला ताजची सैर घडवणारे मुख्यमंत्री, “५००० लोकांना मारायचे होते पण २०० च मेले, छोट्याश्या घटना होतातच हो” असे म्हणणारे कणखर आबा राज्याचे गॄहमंत्री म्हणून लाभल्यावर असेच होणार. ह्यांची गच्छंती आधीच व्हायला हवी होती. पण त्यांचा घडा भरायला थोडा वेळच लागला म्हणायचा.

अमेरिकेवर ९/११ हल्ला झाल्यावर परत का नाही हो झाले हल्ले? मग आपल्यावरच का होतात परत परत? कारण अमेरिका एकत्र येउन उपाय करते . आपण नाही करत .आता वेळ आहे ते एकत्र येण्याची जशी अमेरिका एकत्र आली होती. भले आपण देशात असू १०० कौरव आणि ५ पांडव. बाहेरच्यांसाठी आपण आहोत १०५ हे दाखवून देण्याची.

मग एवढीही राजकिय समज आपले नेते दाखवू शकत नाहीत? देशासाठी आपल्यातले भेदभाव बाजूला ठेवण्याची तयारी नाही ह्यांची? काय गरज होती ताजसमोर येउन एक कोटी मदत जाहीर करण्याची. सगळ्यांपेक्षा महान , स्वयंभू मीच हे दाखवण्याची ही वेळ होती का? देशभक्तीचा मक्ता आपल्याकडेच असे वाटणारया ह्या पक्षाचे सरकार असताना त्यांनी तर अतिरेक्यांना अगदी घरपोच करायला मंत्री पाठवला होता. त्यांनी कशाला बाता कराव्या देशाच्या? करकरेंच्या स्वाभिमानी कुटुंबियांनी ह्यांची एक पै सुद्धा नाही घेतली.

दैवदुर्विलास म्हणजे ह्या घटनेच्या निषेधाचे भाषण पंतप्रधानांनी टेलीप्रॉम्टरवरुन वाचून दाखवले तो क्षण. अगदीच सपक आणि कणाहीन नेतॄत्व. एक कठोर शब्द नाही उच्चारला गेला त्या भाषणात. अशीच प्रतिक्रिया गॄहमंत्री अगदी क्षीण आवाजात, खांदे पाडून देते झाले तेव्हाच त्यांनी अतिरेक्यांचा “ दीज पर्सन्स” असा उल्लेख केला.

मग राजीनामा सत्रच जणू सुरु झाले. पण जनतेच्या डोळ्यात अशी धूळफेक करुन भागेल का? पुढे काय करणार? मुंबईसारख्या ठिकाणी दिल्लीहून कमांडो पोचायला १० तास लागतात. देशाचे गॄहमंत्री किती कमांडो पाठवले ते वाहिन्यांवरुन सांगतात, अरे साधी अक्कल कशी नाही? तुमच्या वाहिन्या अतिरेक्यांचे कमांड सेंटर पण बघतेच की. मग त्यांना तुमच्या सगळ्या हालचाली जाहीर रित्या सांगता?
“दे वील नॉट हार्म यू अनलेस यू लेट देम हार्म यू” असे एक वचन आहे. प्रत्येक वेळी हल्ला झाला की शेजारयांकडे का बोट दाखवायचं? त्या शेजारयांची आपल्याकडे डोळा वर करुन बघायची हिंमत होता कामा नये असे काहीतरी करुन दाखवायलाच लागेल. इतक्या लांब पसरलेल्या किनारपट्टीवर नजर कशी ठेवणार? पण मग इतर देशांनाही आहेच की किनारा, ते काय करतात? आपण जर चंद्राचे फोटो काढू शकतो तर भारताच्या किनारपट्टीच्या लांबीचं कसलं आलंय कौतुक? मानवविरहीत छोटी टेहळणी विमाने आहेत की.

अमेरिका- मेक्सिकोच्या सीमेवर घुसखोरी टाळण्यासाठी एक आभासी( व्हर्च्युअल) कुंपण आहे. त्याचा भंग करुन प्रवेश करायचा प्रयत्न केला की तातडीने तिथे फौज जमते. आपण आपल्या किनारयाचे रक्षण अश्या प्रकारे करु शकत नाही असे मला वाटत नाही. पहिल्याच प्रयत्नात चांद्रकक्षेत यान यशस्वीरित्या सोडणारया देशाला हे नक्कीच अवघड नाही.

प्रतिबंध हाच एकमेव उपाय आहे अतिरेका वर.
आपली सहिष्णुता हा जर आपला कच्चा दुवा बनला तर ते घातक आहे भारतासाठी.

October 28, 2008

अफूची गोळी

बेस्टची बस आणी त्यातील प्रवाश्यांना ओलिस धरु पाहणारया राहुल राज ह्याला मुंबई पोलिसांनी एन्काउंटरमध्ये ठार केले.

होय , मुंबई पोलिसांनी जे केले , ते योग्यच आहे. ह्यामुळे मुंबई/ महाराष्ट्रात बिहारसारखे वागू पाहणारा प्रत्येक बिहारयाच्या मनात भय निर्माण होईल. मुंबई आणी बिहार पोलिसात फार फरक आहे. मुंबई पोलिसांची तुलना स्कॉटलंड यार्डशी केली जाते. त्या तरुणाला वाटले होते की, बिहारसारखे आपण मुंबईत वाट्टेल ते करु शकतो. त्याला इनोसंट म्हणणारया बिहारी नेत्यांनी हे लक्षात घ्यायला हवे की, नोकरी शोधायला आलेल्या गरीब बिचारया तरुणाकडे पिस्तूल कसे आले?

आजपर्यंत सर्वात जास्त रेलवे मंत्री बिहारी झाले आहेत. बिहार मधून मुंबईला जाणारया तरुणांना, बिहारात रोजगाराच्या संधी उपल्ब्ध झालेल्या नाहीत. मिळाल्या त्या फक्त बिहारी रेल्वेमंत्र्यांनी सुरु केलेल्या, मुंबईला घेउन जाणरया रेल्वेगाड्या.

बिहारमध्ये अशी हत्यारे खुलेआम विकली जातात. अश्या राज्यातील नेत्यांनी महाराष्ट्राबद्दल तोंडातून ब्र काढू नये. गेल्या ५०- ६० वर्षांत ह्या बिहारी नेत्यांनी, बिहारची वाट लावली नसती, तर त्या राहुल राजवर आज नोकरीसाठी,मुंबई गाठायची वेळ आली असती का?

आबा पाटील, मुंबई पोलिसांच्या पाठीशी ठाम उभे आहेत , हे चांगलेच आहेत. विलासरावांनी ही संधी साधून लगेच चौकशी सामिती स्थापन केली आहे. कारण गॄह खाते राष्ट्र्वादीकडे आहे. तिकडे शिवसेनेने, मनसेला ह्या मुद्दयावर सुद्धा बरोबर घेउन जाण्याचे नाकारले आहे.

राजने उभ्या केलेल्या आंदोलनामुळे मराठी मनाची त्याला सहानुभुती निर्माण झाली होती. त्याची दखल सर्वच पक्षांना घ्यावी लागली आहे. फक्त नारायण राणे आणी छगन भुजबळ ह्यांनी त्यावेळी सरकारला, रेल्वे भरतीबाबत महाराष्ट्र सरकार, रेल्वे खात्याला तसेच रेल्वे मंत्र्यांना जाब विचारणार आहे का, असे ठणकाउन विचारले होते.

पण आता ज्याप्रकारे बिहारी नेते एकत्र आले आहेत. काही वॄत्तपत्रे आणी सबसे तेज चॅनेल्सना हाताशी धरुन, ज्याप्रकारे हिंदी मिडीयात गरळ ओकली जात आहे, तेव्हा आता ह्या मुद्द्यावर समस्त मराठी नेत्यांनी मतभेद विसरुन एकत्र आले पाहिजे. इस्त्रीचे कपडे दिवसाला तीन वेळ बदलणारे, चापून चोपून भांग काढून फिरणारे, दिल्लीतील, मराठी गॄहमंत्री आता काय भूमिका घेतात हे पहायला हवे.

मुंबई पोलिसांना ह्या बाबतीत पाठिंबा असला तरी, आर आर आबांची वक्तव्ये ही, राज ठाकरेंनी निर्माण केलेल्या, मराठी लाटेवर स्वार होऊन, त्याच्याकडे झुकणारी मते आपल्यापक्षाकडे वळवण्याचा प्रयत्नांचा एक भाग वाटतात.

अशी वक्तव्ये करुन , त्यांनी बिहारी नेत्यांना एक अफूची गोळी रेडीमेड उपलब्ध करुन दिली आहे. ही अफूची गोळी, हे बिहारी नेते येत्या निवडणूकीत वापरतील आणी आधीच विकासापासून वंचित आणी सुन्न असलेली बिहारी जनता अजून बेशुद्ध पडेल.

उद्या, एखादा मराठी कामानिमित्त कोलकात्याला जाताना, त्याला मध्येच बिहारमध्ये, बिहार पोलिसांनी हकनाक उडवला तर?

October 23, 2008

मराठी अस्मिता

दोन महिन्यापूर्वी मी भारतात- पुण्यात असताना घडलेला हा प्रसंग..
तांदुळ आण असे घरुन सांगितले म्हणून गेलो होतो दुकानात, त्याला म्ह्टलं कि ३-४ नमुने दे पाव पाव किलोचे, करुन बघतो, जो चांगला वाटेल तो २ दिवसांनी घेऊन जाईन पोतंभर.
दुकानदार म्हणाला " नही साह्ब, कमसे कम १ किलो लेना ही पडेगा"
मी (मराठीतच) " पाव किलो देतोस का , तरच घेतो'
"नही साहब. १किलो"
मी " नाही घेत जा"
"ठीक है साहब"
डोकं सणकंल होतं. अजून काही औषधे घ्यायची होती.
समोर " ग्रेवाल मेडिकल" मध्ये गेलो.
तो पण गुर्मीत म्हणाला " वैट करना होगा" मी काही बोलायच्या आधीच, त्याची मस्ती सुरु झाली होती.
मी म्हणालो ( मराठीतच) " अरे हो बाबा , मला दिसतंय तू बिझी आहेस ते, मी थांबतो थोडावेळ"
तर मस्तवाल ग्रेवाल म्हणतो कसा " हिन्दी मे बात करिये, मराठी नही समझती"

तांदुळाच्या एपिसोडावरुन टाळकं फीरल होतं त्याला म्हणालो " हरामखोर, भोसडयात गेलास. जरा पुढे गेलो की चव्हाणांचं दुकान आहे, तिथे घेतो"

मी तर निघालो तिथून, पण माझ्या रुद्रावताराचा परिणाम म्हणून कि काय माझ्या आधी आलेल्या ५ कस्टमरांनी त्या ग्रेवालकडून आप्-आपली प्रिस्र्क्रिप्शन काढून घेतली आणि ते ही माझ्या बरोबर चव्हाणांच्या दुकानात आले.

सध्या मराठी अस्मितेचा मुद्दा जोरात आहे, राज ठाकरे त्यांचे विचार आणि इतर घडामोडीनी महाराष्ट्र ढवळून निघालाय. तिकडे असताना काही वाटत नाही ह्या सगळ्या गोष्टींचं पण इकडे इतक्या दूर मात्र बरंच काही जाणवत रहातं.


अश्या मनस्थितीत बरेच विचार येऊन गेले मनात.

तिकडे तामिळी लोक बघा. श्रीलंकेत हे तामिळी दहशतवादी कारवाया करतात. आपले एक पंतप्रधान - त्यांची हत्या केली. आता त्या अतिरेक्यांच्या मुसक्या आवळत आणल्या श्रीलंकेच्या लष्कराने, तर हे सगळे तामिळी एकासुरात गळा काढू लागले. मलेशियात ह्यान्च्या वंशीयावर थोडी कारवाई केली तरी ह्याना इथे भारतात कळा येतात.

आणी आपण मराठी माणसे, आपल्या अस्मितेबद्दल एव्ह्ढे उदासीन का? असेल राजचे एक्झेक्युशन चुकीचे, पण विचार तरी धगधगतायत ना? उद्या हे बिहारी आपल्याकडे येऊन आपली डेमोग्राफी बदलून टाकतील.

अमरनाथ ट्र्स्ट्ला जमीन दिली तर तो ओमार अब्दुल्ला काश्मीरियतचे गळे काढू लागला, त्यात त्याला काश्मीरची डेमोग्राफी बदलण्याचे डावपेच दिसू लागले.

आसामी लोकांनी, आसामात परीक्षेला आलेल्या, बिहारी आणी बंगाली उमेदवारांना हाकलून दिले, तेव्हा सगळे कसे गप्प बसले होते?

मग आता राजने काही केलं ,( त्यामागचा त्याचा उद्देश काही असो) तर आपण मराठीच का ओरड करतो?
इथे महाराष्ट्रात हे भय्ये येऊन त्यांचे काय काय धंदे चालतात ते पहा.

तिकडे आमच्या कोकणात, मल्याळी येऊन शेती करतात- अननसाची आणि माशांची. अननसाची शेती कसली हो? अननसाच्या कोवळ्या कोंबाच्या गंधाने तिकडे नाग आकर्षित होतात, त्यांना पकडून , विषाची आणि कातड्याची तस्करी करतात हे.

ह्या सगळ्यांना महाराष्ट्रच का हवा? तुमचे राज्य विकसीत करा ना?


परप्रान्तीय आय्.ए.एस्.अधिकारी मुंबईत मंत्रालयात बसून , आपल्याकडे मंजुरीला आलेले उद्योग बंगाल आणि कर्नाटकात कसे जाईल ते पाह्तो. हे सगळं बंद व्ह्यायला हवं.

बॅळगाव, निपाणी, गुलबर्गाच्या सरकारी एस्.टी डेपोत जाऊन बघितलेय कधी? बघा महाराष्ट्राच्या एस्.टी गाड्या आणि त्यांच्या चालक- वाहकाला मिळणारी वागणूक. महाराष्ट्राच्याबॉर्डरपर्यन्त गाडी रिकामी येते. कर्नाटकाच्या डेपोच्या फलाटाला लावू दिली जात नाही. विरोधाभास म्हणजे नाशीकपासून कोकणात राजापुरपर्यन्त आणि शिर्डीपासून लातुरपर्यन्त त्यान्च्या कानडी बोर्ड लावलेल्या एस्ट्या मात्र बिन्दिक्कत् फिरत असतात.

अमेरिकेत आणि इंग्लडात इतके परकिय नागरिक आहेत, सरकारी नोकर्या करताहेत, पण म्हणून विमानतळावर इमिग्रेशन ऑफिसर "बाहेरचे" नसतात. ते मात्र नेटीव्ह्च असतात कि नाही?

मग आपण सगळ्याचे महाराष्ट्रात स्वागत का करतो? त्याना मोक्याच्या नोकर्या का देतो?

परवाच्या पुणे सकाळ मधील फॅमिली डॉक्टर ह्या पुरवणीसाठी एक पाककृती स्पर्धा झाली होती त्यात १, २ आणी ३ हे क्रमांक कुणाला मिळाले असतील बरं? सौ. गुप्ता,सौ ओस्वाल आणि सौ.गुजराथी. सकाळने तिन्ही भगिनींच्या पाककृती जश्याच्या तश्या छापल्या आहेत. त्यातील मराठी वाचवत नाही. पुणे सकाळच्या स्पर्धेचा हा निकाल आपल्याला काय सांगतो?

महाराष्ट्राची डेमोग्राफी बदलतेय ती ह्या लोंढ्यामुळेच!!

बघा हे असेच चालू राहिले तर मुंबई- पुण्यात महापालिकेचे व्यवहार हिंदीत होऊ लागतील, आपल्या मुलाना शिकवायला एखादा बिहारी असेल, रेलेवेच्या घोषणा भोजपूरीत होऊ लागतील, सरसोच्या तेलातील बटाटेवडे स्टेशन च्या बाहेर गाडीवर मिळतील, नाष्ट्याला फाफडा अने कढी किंवा जलेबी - दही मिळू लागेल. स्टैट बैंकेत जाऊन आपल्याला धनाचे आवंटन करावे लागेल, घरी गैसचा सिलिंडर घेऊन भैय्या येइल, वैभव आणी विजयचे बैभब आणि बिजय होतील, तसे झाले तरी कुमार केतकरप्रभॄती वसुधैव कुटुंबकम चे नारे देतील!!

मराठी संस्कृती वरचे हे आक्रमण आपणच थांबवू शकतो.

बघा पटतंय का? म्हणून सांगतो..असेल राजचे एक्झेक्युशन चुकीचे, पण विचार तरी धगधगतायत ना? मग आता राजने काही केलं,( त्यामागचा त्याचा उद्देश काही असो) तर आपण मराठीच का ओरड करतो
?